समतापर्व ठरणार वैचारिक प्रबोधनाची पर्वणी 7 ते 14 एप्रिल 2022 पर्यंत चालणार समता पर्व

समतापर्व ठरणार वैचारिक प्रबोधनाची पर्वणी
7 ते 14 एप्रिल 2022 पर्यंत चालणार समता पर्व
समता पर्वामध्ये भारतातील पहिली महिला आदिवासी कुलगुरू सोना झरिया मिंज, प्रसिद्ध वक्ते आंबेडकरी विचारवंत डॉ. कन्हैयाकुमार , प्रसिद्ध जर्नालिस्ट अशितोष कुमार, उद्योग आयुक्त डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत समतापर्व होईल.
यवतमाळ प्रतिनिधी
सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त समतापर्व 2022 चें आयोजन करण्यात आले असून सर्व समाज बांधवांना करिता ही वैचारिक प्रबोधनाची पर्वणीच ठरणार आहे . वैचारिक मंथनासोबतच यवतमाळ आयडॉल , करीयर्स गायडन्स, युवकांसाठी स्वंयरोजगार मार्गदर्शन , सामान्य ज्ञान स्पर्धा , चित्रकला स्पर्धा , रंगभरण स्पर्धा , वादविवाद स्पर्धा , समता ऑलंपियाड स्पर्धा व महिलांच्या विविध स्पर्धेचे वैचारिक तथा मनोरंजनात्मक कार्यक्रम हे वैशिष्ट्यपूर्ण समाजबांधवांच्या कलागुणांना वाव देणारे ठरणार आहे. सोबतच सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शनी, पथनाट्य ,एकपात्री प्रयोग, तथा फुले-शाहू-आंबेडकरी गीतांची स्वरांजली, समता विचारवेध सत्रे, एक क्षण गौरवाचा, विविध वैचारिक पर्व होणार आहे. सोबतच 8 एप्रिल 22 ला सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे व इंडियन आयडॉल आशिष कुलकर्णी यांचा हिट्स ऑफ म्युझिकल शो संयोजक समता पर्व बचत गटाच्या वतीने कार्यक्रम होणार आहे. दि. 7 एप्रिल 22 ला समता पर्व प्रतिष्ठानतर्फे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून समता पूर्व 22 चा आरंभ होईल.
याच दिवशी सायंकाळी गजल मुशायऱ्याच्या उद्घाटकिय सत्रासह 7 ते 10 पर्यंत गझल गायक रुद्रकुमारांची सुमधुर गझल मैफिल शाम -ए- गझल रंगणार आहे.गझल मैफिलीचे निवेदन ख्यातनाम गझलकार किरणकुमार मडावी करणार आहेत. दि. 8 एप्रिल 22 ला ” हिट्स ऑफ म्युझिकल शो ” चा बहारदार कार्यक्रम संपन्न होणार आहे . या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे हे करणार असून प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ , डॉ . जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी माधुरी मडावी , ॲड. रामदास राऊत , इंजि.दिपक नगराळे , इंजि . मनोहर शहारे , प्रा.सत्यवान देठे इत्यादीची उपस्थिती राहणार आहे . दि. 9 एप्रिल 22 ला सकाळी 11 वा. रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच त्याच दिवशी समतापर्वाचे उदघाटकीय सत्र असुन समतापर्व 2022 चेउदघाट्न भारतातील पहिली आदिमवासी महिला कुलगुरू डॉ . सोनाझरिया मिंज यांचे हस्ते होणार तर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रमुख अतिथी डॉ . हर्षदीप कांबळे , विकास आयुक्त उद्योग, प्रसिध्द पत्रकार आशुतोष , नवी दिल्ली यांचे जाहिर व्याख्यान ‘ माध्यमांची जबाबदारी आणि भारताचं भविष्य ‘ या विषयांवर होणार आहे . या कार्यक्रमाला ॲड. फिरदोश मिर्झा, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप मालखेडे व उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे . त्याच सत्रात यवतमाळ आयडॉल चे उदघाट्न होणार आहे . दि. 10 एप्रिल 22 ला सकाळी 11 वा. सामान्य ज्ञान स्पर्धेचे व काव्य स्पर्धेचे आयोजन व विश्वरत्न कला महोत्सव ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन आहे . भारतातील सुप्रसिध्द वक्ते डॉ .कन्हैया कुमार , नवी दिल्ली यांचे जाहिर व्याख्यान भारतीय लोकशाही व भारताचे भविष्य या विषयावर होणार आहे . या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून प्रमोदिनी रामटेके तथा प्रमुख अतिथी म्हणून डॉ . प्रविण इंगोले दिल्ली हे राहतील . दिनांक 11 एप्रिल 22 ला सकाळी महात्मा फुले कृतज्ञता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे . स. 11 वाजता वादविवाद स्पर्धेचे व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यवतमाळ आयडॉल ची दुसरी फेरी होणार आहे .औरंगाबाद येथील आंबेडकरी विचारवंत डॉ . प्रल्हाद लुलेकर यांचे ‘ बहुजन संस्कृतीचे जनक महात्मा फुले ‘ या विषयांवर तर डॉ . प्रभाकर गायकवाड यांचे नव्या शैक्षणिक धोरणावर जाहीर व्याख्यान होणार आहे . दि.12 एप्रिल 22 ला एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून कॉ . संजय भालेराव यांचे संयोजक आहेत . सदर स्पर्धा सेलीब्रेशन हॉल , मेडीकल चौक , यवतमाळ येथे होणार आहे . तसेच प्रसिध्द इतिहासतज्ञ डॉ . सरफरोज अहमद , सोलापूर यांचे सत्यवादी इतिहास या विषयांवर व संध्या सराडकर अमरावती यांचे महिला विषयावर जाहिर व्याख्यान होणार आहे . या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ . लिला भेले असून मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचा जाहिर सत्कार होणार आहे . 13 एप्रिल 22 ला समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या वेळी यवतमाळ आयडॉल ची अंतिम फेरी व विविध स्पर्धा , तसेच भारतीय पारंपरिक वेशभूषा स्पर्धा संपन्न होणार आहे . याच बरोबर समारोपीय कार्यक्रमाला महाराष्ट्रातील मंत्री मा.ना. . विजय वडेट्टीवार , ना . नितीन राऊत , माजी मंत्री शिवाजीराव मोघे , माणिकराव ठाकरे , माजी मंत्री.आ.संजय राठोड , माजी मंत्री,आ .मदन येरावार , माजी मंत्री प्रा. वसंत पुरके , खा.सुरेश धानोरकर , खा .भावना गवळी मा. आ.अशोक उईके तसेच जि.प. अध्यक्षा कालिंदा पवार , नगराध्यक्षा कांचन चौधरी व समतापर्व – 2022 ची कार्यकारिणी उपस्थित राहणार आहे . या वेळी पत्र परिषदेला ॲड. रामदास राऊत , अध्यक्ष समतापर्व 2022 , प्रा. अंकुश वाकडे , इंजि. मनोहर शहारे , प्रमोदिनी रामटेके , राजूदासजी जाधव , मदन फाळेगावकर , ॲड. इम्रान देशमुख , के . एस . नाईक , पल्लवी रामटेके , प्रा . विजय डोंगरे , प्रा . सत्यवान देठे , जितेंद्र ढाणके , इंजि . दिपक नगराळे , नारायण थूल . जे.डी. मनवर , इंजी. आनंद देवगडे ,सुरज खोब्रागडे , ॲड. राहुल पाटील , मुख्य समन्वयक अनिल रामजी आडे , डॉ.ज्ञानेश्वर गोरे , विलास काळे , एम . के . कोडापे , प्रा . माधव सरकुंडे , जियाभाई , मिनाक्षी वेट्टी , डॉ.दिलीप महाले , किशोर भगत , डॉ . बाळकृष्ण सरकटे , डॉ .चंद्रकांत सरदार , घनश्याम नगराळे,राहुल कोचे , भोजराज भगत , चंद्रकांत वाळके , पवन धोटे , डॉ . मिलींद कांबळे , कमल खंडारे , प्रविण देशमुख , कवडू नगराळे इत्यादीची उपस्थिती होती . असे प्रसिध्दी प्रमुख विजय मालखेडे यांनी कळविले आहे .